Posts

Showing posts from September, 2018

आनंदाश्रू

आज फेसबुक वर एक कुत्रा कसा त्याच्या मालकाला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेला याची कहाणी होती. मला एकदम ती भूतकाळात घेऊन गेली. माधववाडी दादर मध्ये लहानाचा मोठा झालो, चाळी होत्या सर्व, साधारण २००४-५ सालची गोष्ट असेल. आमच्या मजल्यावर एका भटक्या मांजरीने काही पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक आमच्याच मजल्यावर राहिला. मजल्याच्या WC च्या पॅसेज मध्ये पडून असायचं. खूप लहान पिल्लू होतं म्हणून त्याच्यासाठी मी आणि माझा भाऊ दूध ठेवायचो आणि त्याच्यावरून आमच्या शेजाऱ्यांशी आमची भांडणं व्हायची. आम्हाला तो काही करू शकत नव्हता मग त्याने त्या पिल्लाला त्रास द्यायला सुरवात केली. पिल्लावर पाणी टाकणे, त्याच्या बसण्याच्या जागेवर पाणी टाकणे असे प्रकार चालू झाले. रोज सकाळी भांडण आणि त्या शेजाऱ्याला शिवीगाळ करून ऑफिस असा प्रकार चालू झाला. त्या पिल्लाच्या आईला कळत होतं आम्ही तिच्या पिल्लाची काळजी घेतोय, इतर कोणी जवळ आले तर ती फिस्करायची. मी एके दिवशी ऑफिस ला गेलो होतो आणि भाऊ पण बाहेर होता त्याचा फायदा घेऊन त्या शेजारच्या डुकराने त्या लहान पिल्लाला ढकलून दिलं, तिसऱ्या मजल्यावरून ते पिल्लू खाली पडलं, माझ्या बाबांन...

कृष्णजन्माष्टमी

एका अद्भुत , अगम्य , नात्यांपेक्षा कर्तव्य आणि कर्म यांना महत्व देणाऱ्या , एका तत्ववेत्त्याचा , एका युद्धकुशल सेनापतीचा , स्त्रीत्वाचा सन्मान राखणाऱ्या पुरुषाचा , प्रेमाची नवीन व्याख्या घडवणाऱ्या , मनुष्यरूपात जन्म घेऊन भगवानपदी पोहोचणाऱ्या , गीतोपदेश करून अज्ञानकाजळी मिटवणाऱ्या युगंधराचा जन्म .  पण आपण मात्र कृष्ण म्हटल्यावर बासरी , गोपिका आणि राधा यातच त्याला गुरफटवून टाकतो . त्याच्या पराक्रमांकडे केवळ चमत्कार म्हणून बघतो . जरासंधाबरोबरच्या युद्धात माघार घेतली म्हणून त्याला रणछोडदास म्हणतो पण तो पळण्याचा निर्णय घेणारा स्ट्रॅटेजिक थिंकर आपण विसरतो . पर्वतासारख्या मोठ्या संकटाचा लीलया बिमोड करतो पण आपण त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करून फक्त अलंकारिक चमत्कारालाच लक्षात ठेवतो .    कृष्णचरित्राचा खरा प्रभाव या कलियुगात फक्त एकाच व्यक्तीवर पडला आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज , बघा विचार करून आक्रमण , प्रतिकार , माघार , सुटका , माणसे जोडण्याची कला आणि मुख्...