आरक्षण
आरक्षण
सध्या कळीचा मुद्दा ठरत आहे. त्याच्या बाजूने आणि विरुद्ध देखील चर्चा चालू आहेत. मी तर या मताचा आहे की जर गरज असेलच तर आरक्षण आर्थिक निकषांवर हवं. आणि जे आरक्षणासाठी पात्र आहेत त्यांना सर्वसामान्य कोट्यामध्ये पात्र ठरवलं जाऊ नये.
याच विषयावर माझ्या एका मित्राचे विचार वाचले. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अनेक क्षेत्रात शिरलेलं आहे. स्किल्ड आणि नॉन-स्किल्ड अशा दोन्ही क्षेत्रात या तंत्रज्ञानाची प्रगती चालू आहे. जिथे अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ शकते तेथे जातीच्या आधारावर आरक्षण हा किती योग्य मुद्दा ठरू शकतो. माझ्यामते आरक्षणापेक्षा प्रशिक्षण, इनेबलमेंट जास्त प्रभावी ठरू शकेल आणि ते देखील जातीनिकष न ठेवता.
स्वप्नील सुनील गुप्ते
+९७१५५९२७४०८५
Comments
Post a Comment